जम्मू: जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्यासाठी व्यापक जनआंदोलन करणार असल्याचे कॉंग्रेसने सोमवारी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या पूर्वीच्या राज्यातील रहिवाशांच्या अडचणींकडे भाजपप्रणित सरकारवरही पक्षाने डोळेझाक केली असा आरोप पक्षाने केला.
केंद्राने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विभाजित करून जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या विभाजनाचा अर्थ असा की जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात कायदा-सुव्यवस्था व पोलिसांवर नायब राज्यपालमार्फत थेट नियंत्रण केंद्र सरकारचेच असेल.
जम्मू-काश्मीर राज्य प्रशासकीय विभाग करून त्याचा गौरव कमी केला आहे, असा आरोप जिल्हा कॉंग्रेस कमिटी, जम्मू (शहर) अध्यक्ष विक्रम मल्होत्रा यांनी केला. जम्मू-काश्मीर डोगरा राज्याचा राज्य दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडावे, यासाठी व्यापक जनआंदोलन छेडण्यास कॉंग्रेस पक्ष तयार आहे, असेही मल्होत्रा म्हणाले.