मुंबई – लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निकालांकडे पाहिलं जात होत. आज चार राज्यांचे निकाल लागले. यानुसार छत्तीसगढ,मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये (Chhatisgadh MP Rajsthan Election Result) भाजपचं सरकार येणार आहे यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएसचं (BRS Sarkar) सरकार जाऊन काँग्रेसची सत्ता आली आहे. आज लागलेल्या चार राज्यांच्या निकालामध्ये तीन राज्यांमध्ये भाजप तर एका राज्यामध्ये काँग्रेस विजयी झालं आहे. देशभरातून पुन्हा एकदा मोदींवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील या विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदींना दिल आहे.
“जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच हे यश आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे” असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटल आहे. (Bjp Vs congress)
आम्हाला यश मिळालं की ते ईडी, सीबीआयने दिलेलं यश आहे म्हणायचं आणि त्यांना यश मिळालं की जनतेचा कौल म्हणायचं. या मानसिकतेत जोपर्यंत विरोधक असतील तोपर्यंत ते सत्तेत येणार नाहीत असं स्पष्ट मत देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच “आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे असा विश्वास देखील फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
फडणवीस पुढे म्हणाले,”भाजपाची मतं ही १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहेत. छत्तीसगडमध्ये १४ टक्क्यांमध्ये मतं वाढली आहेत. मध्यप्रदेशात ८ टक्के मतं वाढली आहेत. जनतेचा विश्वास हा भाजपावर आहे हेच पाहण्यास मिळतं आहे.तसेच या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. तसंच आमचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाची टीम आहे त्या सगळ्यांचं श्रेय आहे असं म्हणत फडणवीसांनी सर्वांचे अभिनंदन केलं.