सातारा -जिल्ह्यात आज 1008 रुग्ण करोनामुक्त झाले. तर काल शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 872 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि विविध करोना केअर सेंटरमधून 1008 जणांना घरी सोडण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
जावळी 38 (8871), कराड 259 (30588), खंडाळा 55 (12206), खटाव 48 (20323), कोरेगाव 94 (17641), माण 38 (13593), महाबळेश्वर 10 (4379), पाटण 56 (9004),
फलटण 49 (29053), सातारा 159 (42059), वाई 55 (13248) व इतर 11 (1461). जिल्ह्यात आजअखेर करोनाबाधितांची एकूण संख्या आता दोन लाख दोन हजार 426 इतकी झाली आहे.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 0 (183), कराड 8 (914), खंडाळा 0 (154),
खटाव 5 (480), कोरेगाव 0 (383), माण 1 (285), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (302), फलटण 0 (477), सातारा 4 (1250), वाई 1 (305) व इतर 0 (71). असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4888 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.