श्रीरामपूर – जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीसह वादळी पावसाने राहुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शुक्रवार राहुरी तालुक्यातील मालुंजे, टाकळीमियॉं, माहेगाव, महाडुक सेंटर, मुसळवाडी आदी गावांना आ. कानडे यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत कोसळले, तर काही घरांचे पत्रे उडून गेले. आ. कानडे यांनी या सर्व कुटुंबांना भेटी देऊन सांत्वन केले, तसेच तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक होते.
भेर्डापूर येथील शेतकरी प्रमोद दांगट, अलका राऊत यांच्यावर वीज कोसळून दुर्दैवी निधन झाले. श्री. व सौ. रवींद्र रघुनाथ साळे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांची रुग्णालयात जाऊन आ. कानडे यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.