नगर – राज्य सरकारने माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक मागे घेऊन माथाडी सल्लागार समिती व माथाडी मंडळ वरील प्रतिनिधींची नियुक्ती करून माथाडी बोर्डाची पुनर्रचना करावी. तसेच माथाडी मंडळात नोंदीत माथाडी कामगारांच्या मुलांना सेवेत घेण्यात यावे, माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी व कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी. माथाडी कायदा बदनाम करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील विविध कामगार संघटनांनी सुचविलेल्या प्रमाणे उपाययोजना करावी, अशा विविध मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर चक्री उपोषण सोमवार पासून करण्यात येणार आहे. या उपोषणास पांठिंबा म्हणून नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समितीची बैठकीत हा निर्णय झाला असून इतर मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव सोमवार (दि.२६) पासून आझाद मैदान मुंबई येथे विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व कामगार समवेत उपोषण करणार आहेत. उपोषणास पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील हमाल, मापाडी, स्त्री हमाल कामगार सोमवार (दि.२६) रोजी. जिल्हाधिकार्यां ना निवेदन देऊन मागण्या मान्य होई पर्यंत बेमुदत चक्री उपोषण करणार आहे.
बाजार समितीवर नोकरशही व उद्योगपतींचे वर्चस्व राहणारा असून शेतकरी प्रतिनिधी नावाला असणारा आहेत. ते सर्व सत्ताधाऱ्यांचे मर्जीतील नियुक्त प्रतिनिधी असणार असून यामुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रिया संपुष्टात आणली गेली आहे. बाजार समितीवर गेलेला हमाल प्रतिनिधींची या विधेयकांनी हाकालपट्टी केली असल्याचे ते म्हणाले.