जोधपुर – कोणीही व्यक्तिगत इच्छेवर मुख्यमंत्री होऊ शकत नाही किंवा त्यांच्या इच्छेवर मुख्यमंत्री ठरत नाही. लोक ज्याला पसंत करतात त्यालाच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. ज्या व्यक्तीला सर्व समाज घटकांची मान्यता आणि प्रेम लाभते तीच व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते असे भाजपच्या नेत्यावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार निर्माण झाले आहेत त्या विषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्याला वसुंधरा राजे यांनी वरील उत्तर दिले.
कॉंग्रेसच्या कारभाराविषयी मतप्रदर्शन करताना त्या म्हणाल्या की आज राजस्थानातील कॉंग्रेस मध्ये ज्या प्रकारे अंतर्गत वाद सुरू आहेत ते पहाता कॉंग्रेस हे बुडते जहाज आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुर्ण एकजुटीने तयार राहावे असे आवाहनही आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
वसुंधरा राजे या दोन दिवसांच्या जोधपुर दौऱ्यावर आल्या आहेत त्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. वसुंधरा राजे या जोधपुर जिल्ह्यातील सरदारपुरा विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत.