नवी दिल्ली – वाढती बेरोजगारी आणि घटते उत्पन्न यामुळे देशातील युवापिढीच्या असंतोषाचा मोठा विस्फोट होण्याचा देशापुढे धोका निर्माण झाला असल्याचा इशारा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी दिला आहे. आज सीएए, एनपीआरच्या विरोधात जो तीव्र असंतोष रस्त्यावर प्रकट होत आहे तो पहाता युवापिढी आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या असंतोषाचा धोका अधिक स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
ढासळत्या अर्थव्यवस्थे मुळे देश चाहोबाजूनी गर्तेत सापडला आहे असे त्यांनी नमूद केले आहे. किरकोळ महागाईच्या दरात झालेली मोठी वाढ लोकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. डिसेंबर 2019 मध्ये महागाईचा हा दर 7.35 टक्के इतका नोंदवला गेला आहे. रिझर्व्ह बॅंकेने जी कम्फर्ट लेव्हल जाहीर केली आहे त्याच्याही बाहेर ही महागाई नोंदवली गेली आहे याकडेही चिदंबरम यांनी आपल्या ट्विटरवर लक्ष वेधले आहे.