ट्रक आणि ट्रॅक्टरची टक्कर होऊन भीषण अपघात झाल्याची घटना छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 20 ते 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ वक्त केली जात आहे.
प्रत्यक्षात मंगळवारी रात्री जोबा मोरजवळ ट्रॅक्टरची भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. ह्या सर्व महिला मजरकट्टा गावातील रहिवासी आहेत. एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.