मुंबई : महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रासायनिक खत विक्रेत्यांना केले आहे. तसेच याबाबत कृषी विभागानेही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे खत पुरवठादारांनी त्यांच्याकडील जुना खत साठा त्याच दराने विक्री करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. तसेच ऊस, फळबागा, भाजीपाला, गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक #खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री @dadajibhuse यांनी केले आहे. pic.twitter.com/27qrHa08mX
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 17, 2022
दरम्यान, याबाबत कृषीमंत्री भुसे यांनी नुकतीच केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहून खत विक्री दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती.
राज्यात 06 डिसेंबर, 2021 रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती 50 किलो बॅगचा खतनिहाय दर, खत कंपनीचे नाव खालीलप्रमाणे. :
(कंसात नमूद दर दि. 13 जानेवारी,2022 रोजीचे)
10:26:26 – स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -1440 (1640). वाढ: 170 रुपये.
10:26:26 – चंबल फर्टीलाईझर्स लि. -1465 (1500), वाढ: 35 रुपये.
12:32:16 – स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज – 1440 (1640) वाढ: 150 रुपये.
16:20:0:13 – कोरोमंडळ इंट. लि. – 1075 (1250) वाढ: 175 रुपये.
अमोनियम सल्फेट: गुजरात स्टेट फर्टी. कंपनी – 875 (1000) वाढ: 125.
15:15:15:09 – कोरोमंडळ इंट. लि. – 1180 (1375 ) वाढ:195.