यवत – चौफुला (ता. दौंड) येथील मुख्य चौकात दररोज नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. परिणामी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात वाहतुककोंडी ही नित्याचीच बाब ठरली आहे. त्यामुळे या चौकातून वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे.
शिरूर – सातारा राष्ट्रीय महामार्गवर चौफुला (ता. दौंड) चौकात बेशिस्त वाहतूकीमुळे कोंडी होत आहे. वाहतूकदारांना शिस्त लागावी म्हणूण या चौकात एकही वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूकदारांना शिस्त लावणाऱ्या वाहतूक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व वाहतूकदारांच्या बेशिस्तीमुळे कोंडी नित्याचीच बनली आहे.
अनेक वाहने थेट रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. सेवा रस्त्याच्याकडेला आणि शिरूर सातारा महामार्गांवर वाहने पार्क करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती असल्यास नक्कीच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटू शकतो.