श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने चौकाचौकांत उच्च दर्जाचे सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय बेलापूर गावाने घेतला, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. व्यापाऱ्यांनी देखील अशाच प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले.
बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तीन ठिकाणी मुख्य चौकात अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्याचे उद़्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचेहस्ते तसेच उपअधीक्षक डाॅ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अप्पर पोलीस कलुबर्मे म्हणाले की, गावात शांतता व कायदा सुव्यवस्था रहावी, याकरीता ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत, ही आनंदाची बाब आहे. परंतु कुणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचाही चोख बंदोबस्त केला जाईल. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की, कॅमेरे लावल्यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवसाय बंद होतील. काही अनुचित घटना घडल्यास पोलिसांना तपास करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे घर असेल किंवा व्यवसाय प्रत्येकाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असेही देशमुख म्हणाले.
माजी जि. प. सदस्य शरद नवले म्हणाले की, सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावात शांतता रहावी, याकरीता गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर व वाहनावर या कॅमेऱ्याची नजर असणार आहे. गावात येणाऱ्या तीन मुख्य चौकात साडेआठ लाख रुपये खर्चाचे कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. या कॅमेऱ्यात अर्धा किलोमीटरपर्यंतचे चित्रण चित्रीत होणार आहे. रात्रंदिवस असे २४ तास हे चित्रण सुरू राहणार आहे.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. पत्रकार देविदास देसाई यांनी सूत्रसंचलन केले. सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुस्ताक शेख, अशोक कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन जालिंदर कुर्हे, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु उर्फ एकनाथ नागले, बेलापूर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी,
जनार्दन ओहोळ, मोहसिन सय्यद, भाऊसाहेब तेलोरे, रमेश काळे, पत्रकार दिलीप दायमा, सहाय्यक फौजदार सुधीर हापसे, पोलीस काँन्स्टेबल भारत तमनर, संपत बडे, रघुवीर कारखिले, नंदकिशोर लोखंडे, गौतम लगड, हवालदार औटी, भालेराव, दादासाहेब कुताळ, अजीज शेख, महेश कुर्ऱ्हे, जाकीर शेख, प्रविण बाठीया, बाबुराव पवार, शहानवाज सय्यद, मोजीम शेख, बाबुलाल पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते