पर्थ – दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील रविवारी झालेल्या लढतीत भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवाचे समिक्षण करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आम्ही हरलो नाही तर ते चांगले खेळल्यानेच जिंकले, असे मत व्यक्त केले आहे. पर्थच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना जास्त मदत मिळत होती. नाणेफेकीपूर्वीच ही खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असल्याचे दिसले होते. त्यामुळे नंतर फलंदाजी करण्यापेक्षा पहिल्यांदा फलंदाजी करणे हिताचे ठरेल असे माझे मत बनले. आम्ही जरी कमी धावा केल्या असल्या तरीही दक्षिण आफ्रिकेलाही त्याचा पाठलाग करणे कठीण पडेल असेही मला वाटत होते. मात्र, आम्हीच क्षेत्ररक्षणात चुका करुन त्यांना विजयाची संधी दिली, असे रोहितने ( Rohit Sharma ) सांगितले.
#T20WorldCup | ऑस्ट्रेलियाने ४२ धावांनी सामना जिंकला, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर!
त्यांच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असल्यानेच अक्सर पटेलच्या जागी रवीचंद्रन अश्विनला संघात कायम ठेवले. त्याचा स्पेल संपल्यावर अखेरच्या षटकांत वेगवान गोलंदाज जास्त भेदक ठरतील असा माझा अंदाज होता मात्र, तो साफ चुकला. तसेच मोक्याच्या क्षणी आमच्याकडून क्षेत्ररक्षणात चुका झाल्या. त्याचाच फटका संघाला बसला. मात्र, एडन मार्करम व डेव्हीड मिलर यांनी अत्यंत कौतुकास्पद फलंदाजी केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही, असेही रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला.
विजय व पराभव हे अटळ असतात. आता या फेरीतील दोन सामने आम्हाला खेळायचे आहेत. झिम्बाब्वे व बांगलादेश यांच्या विरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत निश्चितच स्थान मिळवू मात्र, त्यापूर्वी संघातील सर्व खेळाडूंना झालेल्या चुकांबाबत आत्मपरिक्षण करावे लागणार आहे, असेही तो म्हणाला.
पॉवर प्ले महत्वाचा
फलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे आहे. तसेच गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा करता येऊ नयेत यासाठी योजना तयार करुन त्यानूसार कामगिरी करण्याची गरज आहे, असेही रोहितने ( Rohit Sharma ) सांगितले.