Wafers Business: जर तुम्हीही नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका खास बिझनेस आयडियाबद्दल माहिती देत आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये मंदीची शक्यता खूपच कमी असते. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा हंगाम कधीही संपत नाही. फळ आणि भाज्याच्या वेफर्स व्यवसायाबद्दल बोलत आहोत. म्हणजे तुम्ही बटाटा, केळी, बीटरूट, रताळे, गाजर आणि पपईचे चिप्स बनवू शकता.
सरकार लोकांना स्वावलंबी होण्यासाठी (Aatmnirbhar Bharat) प्रोत्साहित करत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही नोकरी सोडूनही हा व्यवसाय सुरू करू शकता. या वेफर्सना बाजारात मोठी मागणी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या क्षेत्रात अजून मोठ्या कंपन्या उतरलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही.
फळ आणि भाजीपाला चिप्सचा व्यवसाय कसा सुरू करायचा?
यासाठी, सर्व प्रथम तुम्हाला कच्च्या मालाची आवश्यकता असेल. वेफर्स बनणाऱ्या फळांची गरज असेल. यासोबत तुम्हाला मसाले, मीठ आणि खाद्यतेल आवश्यक असेल. वेफर्स बनवण्यासाठी मशिन्सचीही गरज भासणार आहे. फळे किंवा भाज्या सोलून उकळण्यासाठी आणि त्यांचे पातळ तुकडे करण्यासाठी मशीन आवश्यक आहे. मसाला तळण्यासाठी आणि मिसळण्यासाठीही मशीन लागेल. पाऊच छापण्यासाठी मशीन आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही चांगली मेहनत केली तर लवकरच तुमचा व्यवसाय दुप्पट आणि चौपट होईल.
वेफर्स व्यवसायातून पैसे कसे कमवायचे ?
100 किलो उत्पादन तयार करायचे असल्यास, कच्चा माल, मसाले आणि खाद्यतेल आणि इतर खर्चासह सुमारे 5,000 ते 7,000 रुपये खर्च करावे लागतील. काही वेळा भाज्या किंवा इतर फळांच्या किमती थोडी जास्त असू शकतात. अशा स्थितीत बजेट आणखी थोडे वाढू शकते. बाजारात वेफर्सची किंमत सुमारे 150 रुपये किलो आहे. ही किंमत ठिकाणानुसार, बाजारानुसार कमी अधिक असू शकते. 100 किलोची किंमत 15,000 रुपयांपर्यंत असेल. 7000 रुपयांचा खर्च काढून टाकल्यानंतर 8000 रुपयांचा नफा होईल.
एका ढोबळ अंदाजानुसार दररोज 40 ते 60 किलो वेफर्स तयार होतात. सर्व खर्च काढल्यानंतर तुम्हाला सुमारे 70-100 रुपये नफा मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही एका दिवसात 2800 ते 6000 रुपये सहज कमवू शकता. अशा प्रकारे दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई होईल. आजकाल मुंबईत बरेच लोक भाजी किंवा वेफर्सचा व्यवसाय करत आहेत. ते त्यांची उत्पादने भारतात आणि परदेशात पुरवठा करत आहेत आणि भरघोस उत्पन्न मिळवत आहेत.