आळंदी -करोना व्हायरसमुळे गेली तीन आठवड्यांपासून सर्वत्र संचार बंदी, जनता कर्फ्यू व संवेदनशील भागात लॉकडाऊन असे राज्य शासनाचे आदेश असताना दूध, भाजी, फळे, किराणा, हॉस्पिटल, मेडिकल व पाणी आणण्याची कारणे पुढे करीत अनेकजण मोकाट फिरत आहेत. अशाना लगाम बसावा म्हणून दिघी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे, तर आळंदी पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे.
दिघी पोलीस प्रशासनाकडून देहू फाटा, बोपखेल फाटा व हद्दीतील सर्व ठिकाणी शंभर टक्के नाकाबंदी केली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लवांड यांनी सांगितले. तर आळंदी पोलीस प्रशासनाकडून आज दुपारी आळंदी येथील मरकळ चौकात संचारबंदी झुगारून बिनदिक्कतपणे आपली दुचाकी सुसाटपणे चालविणाऱ्या दुचाकीस्वाराचे पूजन (औक्षण) करून पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला.
यावेळी आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, गोपनीय विभागाचे मच्छिंद्र शेंडे, मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले उपस्थित होते. दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लवांड, अजित खटाळ, अशोक तरंगे, कुणाल बाळाप्रसाद कुरेवाढ, विठ्ठल किसन ससे, दस्तगिर तांबोळी, वाहतूक विभागसचे राजेंद्र सोनवणे, टोनपे, कांबळे, घिगे, शेखर शिंदे, तांदळे, संजय माने, पोलीस मित्र नारायण शिनगारे, गजानन बानड, सिद्धार्थ इंगळे, अमोल सोमवंशी, एफ.जे.टोनपे, पिल्लेवार, ए. ए. जायभाय, किरण घोडके यांनी बंदोबस्त ठेवला.
भळगट यांच्याकडून अल्पोपहार
उद्योजक पप्पुशेठ भळगट यांचेमार्फत दिघी, आळंदी पोलीस स्टेशन, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्र आदी अधिकारी कर्मचारी यांना नियमितपणे चहा व अल्पोपहार दिला जात आहे.