लखनौ – शेतकरी व कामगारांच्या विविध संघटनांनी काल आयोजित केलेल्या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहून भाजपला आता नैराश्य आले आहे असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
बंद समर्थकांच्या धास्तीने भाजपचे नेते आणि कार्यकर्ते घराच्या बाहेर सुद्धा पडू शकले नाहीत असा दावाही अखिलेश यादव यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील तसेच राज्यातील सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की या सरकारांनी शेतकऱ्यांना नागवून केवळ धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरण्याचेच काम केले आहे.
बंदच्या निमीत्ताने त्यांनी ही प्रतिक्रीया नोंदवली आहे. समाजवादी पक्षाने या बंदला पाठिंबा दिला होता. उत्तरप्रदेशातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाचाही या बंदला पाठिंबा होता.