भवानीनगर- काटेवाडी परिसरात बिबट्याचे हल्ले सुरुच असून गुरुवारी (दि. 6) पहाटे एका शेतकऱ्या गोठ्यातील कालवड हल्ला करून फस्त केली असल्याने परिसरात अद्यापाही बिबट्याची दहशत कायम आहे.
काटेवाडी, कण्हेरी भागांमध्ये ध्यतरी धुमाकुळ घालणार एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी आणखी एक बिबट्या परिसरत असून तो दररोज एखाद दुसऱ्या पाळीव प्राण्यावर हल्ले करून फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी काटेवाडी येथील असलेल्या धडी पुलाजवळील शेतामध्ये आनंद तुळशीराम कदम यांच्या गोठ्यातील गायीच्या कालवड (जर्सी जातीचे)वर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले.
याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्र परिमंडळ अधिकारी त्र्यंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे व वनकर्मचारी दत्तात्रय पाटोळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर परिसरात पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.