पाटणा – अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या खटल्याची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बिहार भाजपाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने याबाबत माफी मागावी.
बिहार भाजपा प्रवक्ता डॉ. निखिल आनंद यांनी गुरुवारी म्हटले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतीय न्यायपालिकेचा अपमान केल्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. कारण 66 दिवसांपर्यंत सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी दिशाभूल केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्र सरकारने सुशांत प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारकडून माफी मागावी. शिवसेनेचे न्यायविरोधी कृत्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचाही हिस्सा असल्यामुळे प्रमुख नेत्यांनीही माफी मागावी.
त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांचा खोटा मुखवटा उघड झाला आहे.