कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप समर्थकांवर तेथील जनतेकडून आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले होते. या हल्ल्यांची चौकशी सीबीआय तसेच एसआयटीकडून सुरू असून त्यांनी आज कलकत्ता हायकोर्टात तपासातील प्रगतीबाबतचा अहवाल सादर केला.
सीलबंद पाकिटातून हा अहवाल सादर करण्यात आला. या संबंधातील पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हायकोर्टाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा आदेश 19 ऑगस्ट रोजी दिला होता.
या प्रकरणाची सीबीआय व एसआयटी या दोन्ही पातळ्यांवर चौकशी सुरू असून त्यावर हायकोर्टाची देखरेख सुरू ठेवली जात आहे. हिंसाचारग्रस्तांना राज्याच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्याची सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केली आहे.