नवी दिल्ली – आक्षेपार्ह प्रसारण करून देशाच्या सुरक्षेला व सामाजिक ऐक्याला धोका निर्माण करणाऱ्या अनेक वाहिन्यांचे परवाने रद्द केले गेले आहेत. तथापि ही कारवाई करताना त्यांना त्यांच्या भूमिकेविषयी खुलासा करण्याची पुरेशी संधी दिली गेली होती अशी माहिती सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली.
माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री एल. मुरूगन यवांनी सांगितले की एकुण 159 प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. तथापि यातील काही वाहिन्यांनी नुतनीकरणासाठी केंद्राकडे अर्जच न केल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की प्रसारणाच्या ठिकाणी देशहित विरोधी सामग्री प्रसारीत करणे कदापिही मान्य केले जाणार नाही, शेवटी हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आहे. यातील काही वाहिन्यांनी द्वेषमुलक प्रसारण करून देशातील सामाजिक ऐक्याला व शांततेला धोका निर्माण केला होता असे ते म्हणाले.