सुरत: नाशिकचा खो-खो पटू दिलीप खांडवी, वीर अभिमन्यू तर उस्मानाबादची खो-खो पटू जान्हवी पेठे जानकी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी कुमार गटाच्या 39 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो
स्पर्धेत आपापल्या संघांना विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
कुमारांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकवर 13-12 असा विजय साजरा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या दिलीप खांडवीने सामन्यातील सर्वोत्तम वीर अभिमन्यू पुरस्कार मिळवताना एक मिनिट व तीन मिनिट संरक्षण करताना चार खेळाडू बाद केले.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकाचा 9-7 असा एक मिनिट चाळीस सेकंद राखून दोन गुणांनी दणदणीत पराभव केला दिपील आणि जान्हवी यांनी या संपुर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली त्यामुळेच त्यांना अनुक्रमे अभिमन्यू व जानकी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.