मुंबई – अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. एकूण 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 21.8 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) या पुलाला ‘अटल सेतू’ असे नाव देण्यात आले आहे.
हा अटल सेतू मुंबई ते नवी मुंबईला जोडण्याचे काम करतो. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताच्या विकासाचे नवे उदाहरण असतानाच हा पूल देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी नवी जीवनरेखा ठरणार आहे. दररोज सुमारे 70 हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे 400 कॅमेरे बसवण्यात आले आहेत, याशिवाय ट्रॅफिकची माहिती गोळा करण्यासाठी AI आधारित सेन्सर बसवले आहेत.
अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल असून तो देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान होईल. याद्वारे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.
#WATCH | The 21.8km long Mumbai Transharbour link (MTHL), now named ‘Atal Bihari Vajpayee Sewri – Nhava Sheva Atal Setu’, built at a total cost of more than Rs 17,840 crore was inaugurated by PM Modi, today
Maharashtra Governor Ramesh Bais, CM Eknath Shinde and Deputy CM… pic.twitter.com/3iM75feiqr
— ANI (@ANI) January 12, 2024
अटल सेतूची वैशिष्ट्ये
अटल सेतू 21.8 किमी लांब आहे
17,840 कोटी रुपये खर्चून तो तयार करण्यात आले आहे
याची डिसेंबर 2016 मध्ये पायाभरणी झाली
16.5 किमी समुद्रावर आणि 5.5 किमी जमिनीवर बांधला आहे.