नवी दिल्ली :- आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले आव्हान सादर करणार आहे.
यापूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते की,शिखर धवनची निवड होईल आणि त्याला कर्णधार बनवले जाईल,पण तसे झाले नाही.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 स्वरूपात होणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. तसेच या खेळाडूंच्या निवडीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ते विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाच्या नियोजनात नाहीत.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे –
Team India squad : रुतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (wk), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (wk)
Standby list of players : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेट…
आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा भाग घेण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी 2010 आणि 2014 मध्ये, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष किंवा महिला संघ पाठवले नाहीत. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे आणि महिलांमध्ये, पाकिस्तानने दोन्ही वेळा सुवर्णपदक जिंकले आहे.