पाल्लेकेले :- भारतीय संघात दिग्गज फलंदाजांचा व गोलंदाजांचा ताफा असला तरीही नेपाळ संघाला कमी लेखून चालणार नाही. या दोन संघात आशिया करंडक स्पर्धेचा साखळीतील अखेरचा सामना आज रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसाने वाया गेल्यामुळे सुपर फोर गटात स्थान मिळवण्यासाठी या लढतीत विजय मिळवणे भारतीय संघासाठी अनिवार्य बनले आहे.
भारत विरूध्द नेपाळ यांच्यातील सामन्यास 3 वाजता सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (TOSS) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजीचा निर्णय घेत नेपाळ संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
टॉसनंतर रोहित म्हणाला की, प्रथम गोलंदाजी करण्याचे विशेष कारण नाही. गेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि या सामन्यात प्रथम गोलंदाजी करून गोलंदाजांचा सराव करायचा आहे.
भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी शमी खेळत आहे. तर नेपाळच्या संघात आरिफ शेखच्या जागी भीम शर्कीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग ऐरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.