कोलंबो :- इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात (Emerging Teams Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत.
कोलंबो येथे खेळवल्या जात असलेल्या सामन्यात भारताने (India A) टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या (Pak A) संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 352 धावा केल्या. आता भारताला विजयासाठी 50 षटकांत 353 धावा कराव्या लागतील.
पाकिस्तानकडून फलंदाजीत तैयब ताहिरने सर्वाधिक 108 धावा केल्या. साहिबजादा फरहानने 65 आणि सॅम अयुबने 59 धावा केल्या. ओमेर युसूफ आणि मुबासिर खान यांनी प्रत्येकी 35-35 धावांचे योगदान दिले.
मोहम्मद वसीम ज्युनियर 17 धावा करून नाबाद राहिला. मेहरान मुमताजने 13 धावा केल्या. मोहम्मद हारिस दोन धावा करून बाद झाला तर कासिम अक्रम खातेही उघडू शकला नाही. सुफियान मुकीमने नाबाद चार धावा केल्या.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत राजवर्धन हंगरगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.