मुंबई – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देशातील सर्वात फेमस कपलपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांना विरुष्का म्हणत असतात. या दोघांचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.अशात दोघांच्या कामाचा प्रभाव देखील एकमेकांवर पडताना दिसतो. कालही तसेच काहीसे झाले. भारताने टेस्ट मॅच गमावल्यानंतर अनुष्का शर्माला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.
India win % is 0 when Anushka Sharma present in the stadium in ICC tournaments. pic.twitter.com/kI0m0JpGiG
— Johns. (@joh_n_s_) June 11, 2023
झालं असं की, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात हरला. याचा राग नेटकऱ्यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मावर काढायला सुरुवात केली. कारण ती इतर खेळाडूंच्या पत्नींप्रमाणे क्रिकेट संघाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. भारताने मॅच गमावल्यानंतर अनेकांनी अनुष्काला सोशल मीडियावर टार्गेट करत जोरदार ट्रोलिंग केल्याचे पाहायला मिळाले.
Anushka Sharma is trending in captaincy so she is the captain of Indian team🤣
— 𝐊𝐨𝐡𝐥𝐢𝐧𝐚𝐭!𝟎𝐧_👑🚩 (@ElonKiMaakiCute) June 11, 2023
ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा काही उद्धट नेटकऱ्यांनी अनुष्का शर्माला विराट कोहली बाद झाल्यानंतर किंवा ज्या दिवशी त्याची कामगिरी चांगली झाली नाही त्याबद्दल जबाबदार धरले.या आधी देखील असे अनेकदा झाले आहे.
People trolling Anushka Sharma for India’s loss I am already loving it.
— IshitaTiwari (@Tiwariishitaa) June 11, 2023
विराट कोहली 49 धावांवर बाद झाला. त्याची विकेट स्टीव्ह स्मिथने घेतली. आणि भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का होता. कोहलीच्या बाद झाल्यावर अनुष्काची रिऍक्शन देखील कॅमेऱ्यात कैद झाली.यावेळी काहींनी अनुष्काला पनौती म्हंटले आहे तर काहींनी मॅच पाहायला का येते ? असा सवाल उपस्थित केला आहे.