वायनाड : देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत असून देशातील प्रत्येकाल याची कल्पना आहे, अशी टीका राहूल गांधी यांनी आज येथे केली.
बंदीपूरमध्ये रात्री प्रवासाला बंदी घातली आहे त्याला विरोध करण्यासाठी राहूल गांधी येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
बुध्दीवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याच्या घटनेबाबत बोलताना गांधी म्हणाले, देशात काय चालू आहे हे साऱ्यांना माहित आहे. ते काही लपून राहिले नाही. प्रत्यक्षात साऱ्या जगाला माहित आहे, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारविरोधात जो कोणी बोलेल त्याला तुरूंगात डांबण्यात येत आहे. माध्यमांना गुंडाळण्यात येत आहे.