मुंबई – 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. यामुळे देशमुखांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
अनिल देशमुख हे काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांच्याविरोधात ईडीने वारंवार समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाही.
त्यातच त्यांनी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या मनी लॉंड्रिंगप्रकरणी सुरक्षेची मागणी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.