मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी संदर्भात आता शरद पवार यांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाईच्या मुद्यावर या भेटीत चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले. यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोध पक्षातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होतांना दिसून येत आहे.
मोदी – पवार यांच्या भेटीवरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का? असा खोचक सवाल ट्विट करत विचारला होता. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिउत्तर देत इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली.
अजित पवार म्हणाले,’सद्या महाराष्ट्र मध्ये वेगळे राजकरण सुरू आहे. दोन समाजमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय पक्ष समाजमध्ये द्वेष निर्माण करत आहे’ अशी टीकाही पवारांनी केली.
दरम्यान, मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘आसावरी जोशी’ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अन्य नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकरांशी बोलतांना अजित पवार यांनी इम्तियाज जलील यांच्यावर खोचक टीका केली आहे.