हजारो कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य टांगणीला
मुंबई: एकेकाळी देशाचे भूषण समजली जाणारी एअर इंडिया कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. मोदी सरकारने सोयीचा मार्ग पत्करत ही विमान कंपनी विक्रीस काढली आहे. कंपनीचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
हवाई प्रवासी वाहतूक क्षेत्रासमोर आव्हाने असली तरी खासगी विमान कंपन्या व्यवसायात तग धरून आहेत. मग एअर इंडियासारखी सरकारी कंपनी सरकारला योग्य पद्धतीने का चालवता येत नाही? कंपनीचे पूर्ण खाजगीकरण करण्याइतकी केंद्र सरकारसाठी एअर इंडिया डोईजड झाली आहे का? या प्रश्नांचे उत्तर मोदी सरकारने द्यायला हवे, असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.