निघोज – पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील राजेश गोपाळे यांचा बोराचा बाग दि.२६ च्या गारपिटीत तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उद्ध्वस्त झाला. गोपाळे यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
गेली सहा वर्षापासून ते बोराच्या दोन एकर बागाचे संगोपन करीत असतात. प्रत्येक वर्षी साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च असून साधारण आजपर्यंत बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले असले तरी यावर्षी किमान उत्पन्न पाच लाख रुपये अपेक्षित असल्याने त्यांचा बोराचा बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने त्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला. अगोदरच शेतीमालाला भाव नाही, त्यातही गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचे अस्मानी संकटाने शेतकऱ्यांनी करायचे तरी काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.