नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींनी गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीर दौऱ्यावेळी तब्बल १४ तास पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहचले होते. राहुल गांधी वैष्णोदेवीच्या दिशेने चालतानाचा व्हिडियोही चांगलाच व्हायरल झाला होता.
राजकीय वर्तुळासोबतच नेटिझन्समध्ये देखील राहुल गांधींच्या या देवी दर्शनाची आणि १३ किलोमीटर पायी प्रवासाची चर्चा रंगली होती. मात्र, पायी चालत गेलेल्या रस्त्याचे तेथील स्थानिक भाजप नेत्यांनी गंगाजल टाकून शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
एका हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीर भाजप युवा संघटनेचे प्रमुख अरुण जामवाल यांनी ही सगळी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली. ते याबाबत म्हणाले,’राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वैष्णोदेवी स्थानाचं पावित्र्य भंग केलं आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे यात्रा मार्गावर फडकावले. तसेच, राजकीय घोषणाबाजी देखील केली”, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.’