मुंबई – दिया मिर्झा आणि बिजनेसमन वैभव रेखी यांचा विवाह नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो अजून सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सध्या दिया आणि वैभव मालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतेय. दीया मिर्झा आणि वैभ रेखी या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.
View this post on Instagram
वैभव रेखी हा प्रख्यात योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीचा पती होता. त्यांच्यात घटस्फोट होऊन गेला आहे आणि त्यांना एका मुलगी देखील आहे. तर दिया मिर्झानेही 2014 साली बॉयफ्रेंड साहिल संघाबरोबर लग्न केले होते.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर दिया आणि वैभव यांच्या मालदीव्हज मधील व्हॅकेशनचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान याचवेळी दिया आणखीन एक ट्विट करत चर्चेत आली आहे. सध्या तिच्या फोटोंपेक्षा तिच्या या ट्विटनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे विषारी रसायने पुरुषांच्या प्रायव्हेट भागावर परिणाम करतात, असं एका संशोधनातून समोर आलंय. यावर दिया ट्विट करत म्हणते की… “या माहितीनंतर लोक कदाचित पर्यावरण रक्षणासाठी जागरूक होतील, अशी मार्मिक प्रतिक्रिया तिने दिली. दियाचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेकांनी यावर प्रितिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दीया नेहमीच आपल्या ट्वीटद्वारे लोकांना निसर्गाविषयी जनजागृती करताना दिसते.
View this post on Instagram