पुणे – कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिल. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली.
सतत चर्चेत असणारे बिचकुले आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतंच (दि. 24) अभिजित बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला होता. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांची पत्नी ‘अलंकृता’ यांना आपल्या स्वभावानुसारच हटके पत्रं लिहिलं. त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या. या पत्रात अभिजीत बिचुकले यांनी पत्नी अलंकृता बिचुकले यांना चक्क “तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल..’ असं म्हंटलं होत.
मात्र, त्यानंतर अनेकांनी अभिजीत बिचुकले यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. याविषयी माध्यमांशी बोलताना बिचुकलेनं सांगितलं, ‘मी हे पहिल्यांदाच बोललो नाही. यापूर्वी देखील मी असं म्हणालो होतो, आमच्या सौभाग्यवतींनी 2009 मध्ये उदयनराजेंविरुद्ध पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा साताऱ्यात पत्रकार परिषदेत मी हे बोललो होतो.’ असं ते म्हणाले.
पुढे बोलताना बिचकुले म्हणाले, ‘मी स्वत: संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे, तसेच मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्या महिलेला भारतीय संस्कृतीची पूर्ण माहिती असायला हवी, आणि माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचे सौंदर्य, संस्कृती आणि प्रतिष्ठा जपणारी आहे’. असंही बिचुकलेनं यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात अभिजित बिचकुले आपल्या महाराष्ट्रात दौऱ्यात आणखी कोणते महत्वाचे मुद्दे मांडणार आहेत आणि कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.