वाशिंग्टन – करोना विषाणू महामारीमुळे पुढील एक-दीड वर्षात 15 कोटी जनता गरीब बनणार असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले आहे.
जागतिक बॅंकेने म्हटले की, सर्वच देशात महामारी दरम्यान अनेक समस्या निर्माण झाल्या असून अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलला आहे. 2020 मध्ये 8 कोटी ते 11 कोटींपेक्षा अधिक जनता गरिबी रेषेत आली आहेत. 2021 पर्यंत ही संख्या 15 कोटींपर्यंत पोहोचणार असल्याचे जागतिक बॅंकेने सांगितले.
गरिबीवर एखादा देश किती प्रमाणावर नियंत्रण मिळवितो हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर निर्भर करते. मात्र जवळपास सर्वच देशांची अर्थव्यवस्था ढासळत चालली असल्यामुळे गरिबीचे प्रमाण आटोक्यात आणणे सध्यातरी हाताबाहेर असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे अनेक देश हे गरीब राष्ट्र बनणार आहेत.
जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटले, “महामारी आणि मंदीमुळे जागतिक लोकसंख्येच्या 1.4 टक्क्यांपेक्षा अधिक जनता दारिद्य्र रेषेच्या खाली जाणार आहे.”