परिंचे – वीर (ता. पुरंदर) धरण 100 टक्के भरले असून धरणातून नीरा नदी पात्रात 23 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येते आहे. पाच दरवाजे उचलण्यात आले आहे. तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 800 क्युसेक पाणी सोडण्यात आले असल्याचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले.
नीरा नदी धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून वेळवंडी व कानंदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदीपात्रात येत आहे. त्यामूळे नीरा नदी काठावरील गावाणा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणावरील लाभ क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी दिलासा मिळाला असून धरणांमधून सासवड व लोणंद शहरांसह अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याचे अभियांत्रिकी सहायक अभियंता संजय भोसले यांनी सांगितले. यावेळी संभाजी शेडगे, अरुण भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.