नवी दिल्ली – चीनशी मतभेद वाढल्यानंतर भारत व्यापार वाढविण्यासाठी इतर देशांबरोबर सहकार्य करार करण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भात प्रयत्न करीत आहेत. या विषयावर याअगोदरच चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनने भारताबरोबर मुक्त व्यापार करणार करण्यास उत्सुकता दाखविली आहे आणि नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारचा करार होऊ शकतो, असे वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. भारत आणि इंग्लंडदरम्यानचा व्यापार अगोदरच जास्त आहे. मुक्त व्यापार करार झाल्यानंतर या व्यापारात आणखी वाढ होऊ शकते.