कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदाराच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री ममता यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहले आहे. भाजपने ही राजकीय हत्या असल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारला हटविण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपने राष्ट्रपतींची देखील भेट घेतली.
भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर दुसर्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहले, भगवा पक्षाने तथ्ये विकृत करून माहिती दिली असेल.
योग्य तपासासाठी हे प्रकरण सीआयडीकडे पाठविण्यात आले असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
तृणमूल कॉंग्रेसचे संसदीय पक्षाचे नेते डेरेक ओ ब्रायन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती भवनात कोविंद यांची भेट घेऊन या प्रकरणाची सत्यता सांगितली.
पत्रात बॅनर्जी यांनी राज्य पोलिसांच्या प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत असे म्हटले आहे की, देवेन्द्र नाथ राय यांचा मृत्यू ‘संशयित आत्महत्येची’ घटना आहे.
‘पोस्टमार्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासणीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांनी त्याला संशयित आत्महत्येचे प्रकरण म्हणून घोषित केले आहे. हे पैशाच्या व्यवहाराचे स्थानिक प्रकरण असू शकते. राय यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्या भागात अशा दोन लोकांच्या नावांचा उल्लेखही केला आहे. जे पैशाच्या व्यवहारामध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.