सोरतापवाडी -उरुळी कांचनमधील सासू आजारी असल्याने भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे हदयविकाराने निधन झाले उपचारादरम्यान करोना टेस्ट केली ती व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर नागरिक हवादिल झाले होते. पण आज रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या सर्व कुटुंबीयांतील सर्व 17 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उरुळी कांचन करोनामुक्त झाले आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी सुचेता कदम यांनी सांगितले. डॉ. सुचेता कदम, सरपंच राजश्री वनारसे, उपसरपंच जितेंद्र बडेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यश आल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
उपसरपंच जितेंद्र बडेकर म्हणाले, आज ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावली असून उरुळीकांचनमधील व्यापाऱ्यांना दिलासा देऊन व्यवहार हळूहळू पूर्व पदावर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवून देणार आहोत.