नवी दिल्ली ; औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवे, हा धडा करोनाच्या साथीने दिला आहे, असे मत प्रख्यात शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांनी दिला आहे.
इस्रोचे माजी प्रमुख म्हणाले, देशात वैद्यकीय उपकरणांची निर्मिती गरजेच्या दहा टक्केही होत नव्हती. आपण करू शकणार नाही एवढे अवघड कोणतेही तंत्रज्ञान नाही. अन्य लोकांना ते आकर्षक किंमतीत आपल्याला विकण्याची इच्छा होते, ती आपल्याला होत नाही. किमान किंमतीत अत्यूच्च दर्जाची उतपादने हे धोरण आपण स्वीकारायला हवे, असे ते म्हणाले.
अन्य ठिकाणहून आपल्याला उपलब्ध होते की नाही हा प्रश्नच नाही. तर काही क्षेत्र अशी असतात की त्यात आपण स्वयंपूर्ण असावे लागते. सध्या ज्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत त्यावरून सरकारला याची पक्की जाणीव आता झाली असेल, अशी मला खात्री आहे, असे ते म्हणाले. करोना संदर्भात भारताचे प्रयत्न खुप खुप कौतुकास्पद आहेत. केवळ भारतच नव्हे तर जगाने हे मान्य केले आहे. भारताकडे करोनाला नियंत्रणात ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे घबारण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.