चांदा – टॉमेटोला भाव नसल्याने म्हाळस पिंपळगाव येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील गट नंबर 407 मधील रस्तापूर शिवारातील महेश भानुदास भागवत या शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये टॉमेटोची लागवड केली. त्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च झाला. परंतु करोनामुळे टॉमेटोचे बाजारभाव पार गडगडल्याने व बाजार बंदमुळे पूर्ण टोमॅटोचा फडच या शेतकऱ्याने शेतात सोडून दिला. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.