मुंबई – कोरोना विषाणूने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केल्यानंतर हळूहळू आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली असून, आता राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज (दि. 21) आणखी 11 करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या 63 वर गेली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री ‘राजेश टोपे’ यांनी दिली.
दरम्यान, ठाकरे सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रातील चार मोठी शहरे अंशतः बंद केली आहेत. त्याचबरोबर 31 मार्च पर्यंत राज्यातील या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. शिवाय, काम बंद राहिले तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये, आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे.