पुणे : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालिकेत थेट जनता दरबार भरविला. प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी हा दरबार भरविण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या समस्या पालिका आयुक्तांनी जाणून घेतल्या.
या समस्या संबंधित खाते प्रमुखांना पाठविण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी या दरबारात सुमारे 25 नागरिकांनी आपल्या समस्याच पाढा आयुकताच्या समोर मांडल्या.