हैदराबाद : येथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
एलबीनगर भागात हस्तिनापुरममध्ये सोमवारी एका घरात चार मृतदेह सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी प्रदीप (वय 40), त्यांची पत्नी स्वाती (वय 35), त्यांची दोन मुले कल्याणकृष्णा (वय 6), आणि जयकृष्णा (वय 2) यांचे मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळले.
पत्नी आणि मुलांच्या अन्नात विष कालवून त्याने त्यांची हत्या केली असावी. त्यानंतर तेच अन्न खाऊन स्वत:ही आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शनिवारपासून त्यांच्या घारतून कोणीही बाहेर आले नाही म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घराचे दार फोडून पाहिले असता बेडवर चार मृतदेह आढळले.
पोलिसांनी विच्छेदनासाठी मृतदेह सरकारी उस्मानिया रुग्णालयात हलवले आणि तपास सुरू केला. प्रदीप यांनी आर्थिक चणचणीतून हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. माल तुमच्यावर ओझे टाकायचे नाही, असे त्याने त्याच्या वडिलांना पाठवलेल्या पत्रात लिहले होते, असे समजते.