कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये आठ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा एक्केचाळीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, विवेकानंद कॉलेजचे एनसीसीचे विद्यार्थी, राजाराम महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी स्वंयसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी गांधी मैदान, पंचगंगा नदी घाट, रियालन्स मॉल पिछाडीस, हुतात्मा पार्क, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप व माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी मार्केट, टेंबलाईवाडी उड्डान ते लोणार वसाहत मेनरोड, कोटीतीर्थ तलाव, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदीर परिसर तसेच कळंबा तलाव या परीसराचीही स्वच्छता या मोहिमेत करण्यात आली. या मोहिमेत 4 जेसीबी, 7 डंपर, 6 आरसी गाडया व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
पंचगंगा घाटाची येथे प्लॅस्टिक बंदी, ओला सुका कचरा वर्गीकरण, पाण्याची बचत बाबत जनजागृती फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र अर्टि बॅटरी एन.सी.सी विद्यार्थींच्यावतीने शहरातील सर्व पुतळे यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच महात्मा गांधी मैदान येथे माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले, वृक्षप्रेमी स्वंयसेवी संस्था, लहान मुले, खेळाडू व भागातील नागरीकांना आयुक्तांनी स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी बोलतांना आज स्वच्छता मोहितेचा एक्केचाळीसावा रविवार आहे. आपण सर्वांनी तसेच विविध स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून वाईट प्रवृत्तीचे प्रबोधन करुन तरुण पिढीला व्यसनाधिनतेपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसेच त्यांना अशा कृत्याबाबत होणाऱ्या कठोर कारवाईची जाणीव करुन दिली पाहिजे. कोल्हापूर शहर 1 मार्च पर्यंत प्लॅस्टिकमुक्त झाले पाहिजे यासाठी शहरातील सर्व निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये ही प्लॅस्टिकमुक्त करणार असलेचे सांगितले.
यासाठी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी पालक यांची एकत्रितपणे बैठक आयोजित करुन त्यांच्यात प्लॅस्टिकबाबत जनजागृती करणार तसेच शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी मानवी साखळीद्वारे प्लॅस्टिक बंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाण्याची बचतबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन प्रबोधन करणार असलेचे सांगितले.
यावेळी नगरसेविका सौ.गिता गुरव, रिया गुरव, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, कळंबा ग्रामपंचायचे सरपंच सागर भोगम, स्वच्छतादूत अमित देशपांडे, शाखा अभियंता आर.के.पाटील, महाराष्ट्र अर्टि बॅटरीचे कमांडिंग ऑफिसर कर्नर संजीव सरनाईक, सुभेदार मेजर मुकेश कुमार, एनएनसीसीचे 200 कॅडसनी, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, राजाराम विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.विश्वनाथ बिटे, महावीर कॉलेजचे एनसीसीचे ऑफिसर लेफ्टनंट उमेश वांगदरे, निवृत्त पोलिस उपअधिक्षक राजेंद्र शेडे, लिंगाप्पा पाटील, सुधीर पाटील, अरुण टोपकर, ओंकार साळोखे, जयदिप हुजरे, संस्कार पाटील, सर्व आरोग्य निरिक्षक, कर्मचारी व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.