थिरूवनंतपूरम -करोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने राज्य पातळीवर दिलेला आपत्तीचा इशारा शुक्रवारी मागे घेतला. करोनाची लागण झालेले नवे रूग्ण आढळले नसल्याने ते पाऊल उचलण्यात आले. चीनमध्ये थैमान घातलेल्या करोनाची लागण केरळमधील तिघांना झाली. त्यामुळे 3 फेब्रुवारीला केरळ सरकारने राज्यात आपत्ती जाहीर केली.
आता आपत्तीचा इशारा मागे घेण्यात आला असला तरी करोनाचा धोका वाढू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येणार आहे, असे त्या सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केरळमध्ये नवे करोनाबाधित आढळले नसले तरी अजूनही 3 हजारहून अधिक जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यातील 61 जण विविध रूग्णालयांमध्ये दाखल असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.