2.5 लाखांच्या उत्पन्नावर कोणाताही कर नाही
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना दिलासा दिला आहे. नवी करप्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला यापुढे कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. या अगोदर ही मर्यादा 2.5 लाख होती. आता ती 5 लाख करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले आहेत. सध्या 2.5 लाख रूपये ते 5 लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागत होता. आता 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.
5 ते 10 लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागत होता. आता त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यानुसार 5 लाख ते 7.5 लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर लागेल आणि 7.5 ते 10 लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केले.
10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आतापर्यंत 30 टक्के कर लागत होता. आता त्यातही तीन स्लॅब पाडण्यात आले आहेत. 10 ते 12.5 लाख रूपये उत्पन्न असणाऱ्यांना आता 20 टक्के कर लागेल. तर 12.5 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता 25 टक्के आयकर भरावा लागेल. 15लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे 30 टक्के आयकर भरावा लागणार आहे.
पहा नवी करप्रणाली….
* 5 लाखांपर्यंत कोणताही कर नाही
* 5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
* 7.5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर लागणार
* 10 ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागणार
* 12.5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर लागणार
* 15 लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे 30 टक्के कर लागणार