कोलकाता – पश्चिम बंगाल मधील 90 टक्के लोकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. त्या योजनेअंतर्गत लोकांना दोन रूपये किलो तांदुळ, दिला जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील दुर्गम भागातील रहिवासी, सिंगुरचे शेतकरी, आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
लोकांना स्वस्तात अन्नधान्य पुरवण्यासाठी राज्य सरकारने खाद्य साथी योजना सुरू केली आहे. 27 जानेवारी 2016 पासून ही योजना सुरू आहे. जवळपास 90 टक्के लोकसंख्येला दोन रूपये किलो दराने तांदुळ राज्य सरकारतर्फे पुरवला जात आहे. आणखी 50 लाख लोकांना मार्केट रेट पेक्षा निम्म्या दरात तांदुळ पुरवला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.