नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षात देशातील वनाखाली असलेल्या जमीनीची भाग 5188 चौरस किमीने ने वाढला आहे. भारताच्या वन विभागाच्या 2019 च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. ते म्हणाले की देशात सन 2017 च्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 42.6 दशलक्ष टनाने वाढले आहे. तथापी देशातील वनाच्छदानाचा भाग वाढल्यामुळे आपण पर्यावरण रक्षणाचे जे उद्दीष्ठ ठरवले आहे ते साध्य करू शकतो असा विश्वास आपल्यात निर्माण झाला आहे.
ते म्हणाले की देशातील वनाखाली असलेल्या जमीनींचा भाग वाढला असला तरी ईशान्य भारतातील 765 चौरस किमीच्या क्षेत्रावर जंगलतोड झाली आहे. आसाम आणि त्रिपुरा वगळता ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये जंगल तोड होत असल्याचे लक्षात आले आहे.