नवी दिल्ली – भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान रणनीतिक सामंजस्य परिषद सहकार्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पहिल्यापेक्षा अधिक बळकट आणि दृढ होतील, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियाच्या आपल्या प्रवासामध्ये प्रसिद्धी माध्यमांबरोबर चर्चा करताना हे मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी गेल्या तीन वर्षांमध्ये दुस-यांदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे.
भारताच्या ऊर्जा पूर्ततेसाठी सौदी अरेबिया एक विश्वासू सहकारी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याबद्दल मोदी यांनी सौदी अरेबियाचे कौतुक केले. सौदी अरेबियाचे राजे “प्रिन्स’ एचआरएच मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबर आपले उत्कृष्ट व्यक्तिगत संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाह सलमान आणि एचआरएच युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यानचे व्दिपक्षीय संबंध आणखी चांगले मजबूत होतील, , उभय देशांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य, सहयोगाचे एक नवीन युग प्रारंभ होणार आहे. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उभय देशांतील संबंध आता केवळ बळकट झाले आहेत असे नाही तर ते अधिकाधिक दृढ झाले आहेत.
संरक्षण सहकार्यावर भारत आणि सौदी अरेबिया यांच्या संयुक्त समितीच्या नियमित बैठका होत आहेत. दोन्ही देशांनी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये एकमेकांचे हीत लक्षात घेवून सहकार्य करण्यासारखी अनेक क्षेत्रांची निवडही केली आहे.
सुरक्षा सहकार्य, संरक्षण उद्योग यामध्ये सहयोगाविषयीही सामंजस्य करार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही देशांमध्ये एक व्यापक सुरक्षा संवाद तंत्र कायम ठेवण्यासाठी सहमती झाली आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.