नगर – आयटी पार्कच्या नावाचा डांगोरा पिटत एमआयडीसीत कॉल सेंटर सुरु केले. मात्र, नगर एमआयडीसीची खंडणीखोर, युनियन नेते यांना पाठबळ देवून आमदार संग्राम जगताप व माजी आमदारांनी पाठबळ देवून एमआयडीसीचे वाटोळे केले आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही भैय्या हे बनावटच असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी विधानसभेचा जाहीरनामा व वचननामा जाहीर केला. यावेळी भारिप बहुजन महासंघचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, सुनील शिंदे, दिलीप साळवे, विनोद गायकवाड, मोहण वाखुरे आदी उपस्थित होते.
नगर शहराला औद्योगिक शहर म्हणजेच उद्योग नगरी म्हणून निर्माण करण्याचा मानस काळे यांनी व्यक्त केला. तसेच तरूणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यार आहे.